शेतीमध्ये आच्छादनाचा वापर [मल्चिंग]
आच्छादनामुळे शेतात झाडाजवळील शेत जमिनीचा पृष्ठभाग झाकून ठेवता येतो. त्यामुळे पाण्याची बचत होते व उत्पन्न वाढविण्यासाठी मदत होते.पिकाची पाण्याची गरज 20 ते 30 टक्क्यांनी कमी होते तसेच जमिनीत हवा खेळती राहते व तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. राहुरी विद्यापीठात झालेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की काळया प्लॅस्टिकच्या आच्छादनामुळे पिकानुसर 12 ते 48 टक्के उत्पादनात वाढ होऊन पाण्याची जवळपास 20 टक्के बचत होते. तसेच तन नियंत्रण सरासरी 80 ते 90 टक्के होते. ठिबक सिंचन पद्धतीत आच्छादन केल्याने वेगवेगळया पिकांच्या उत्पादनात 10 ते 80 टक्के लक्षणीय वाढ झाली आहे, तसेच पाण्याची 10 टक्के अतिरिक्त बचत झाल्याचे आढळून आले.
आच्छादनाचे विविध प्रकार
आच्छादनाचे विविध प्रकार
- सेंद्रिय आच्छादन उदा . ज्वारीची धसकटे, तुरकाड्या, वाळलेले गवत, गव्हाचा भुसा व काड, उसाचे पाचट, कपाशीचे काड, वाळलेली पाने यांचा समावेश होतो.
- असेंद्रिय आच्छादन यामध्ये प्लॅस्टिकच्या वेगवेगळ्या आच्छादनाचा समावेश होतो. उदा. चंदेरी, काळया, पांढऱ्या, निळ्या, पिवळ्या, लाल, आकाशी, व पारदर्शक रंगाचे प्लास्टिकचे आच्छादन इत्यादी. टोमॅटो या पिकासाठी तांबड्या रंगाचे आच्छादन तसेच बटाटा या पिकासाठी फिक्कट निळे पांढरी रंगाचे आच्छादन वापरल्याने उत्पादनात लक्षणीय वाढ होते असे आढळून आले आहे.
Comments
Post a Comment
नमस्कार मित्रांनो