️आच्छादनाचे 50 चमत्कार

बरेच शेतकरी ऊस कारखान्यास दिल्यावर पाचट जाळून टाकतात पण असे न करता त्याचा आच्छादन म्हणून वापर केला गेला पाहिजे. हिवाळ्यात, उन्ह्याळात किती पण उष्णता आसू दे पाला पाचोळ्याच्या खाली तुम्हाला ओलावा जाणवतो ना मग पाचट जाळू नका व उत्पनात वाढ होते हे स्व:ता अनुभवा, खालील फायदे वाचा व पर्यावणचे पण रक्षण करा

१ ) तणांचा कायमचा बंदोबस्त होतो .
२ ) पाण्याची ५० % बचत होते .
३ ) सर्वच प्रकारच्या उपयोगी जीवजंतुंची जमिनीत झपाटयाने वाढ होते .
४ ) जमिनीची सुपिकता वाढते.
५ ) जमिनीचा पोत वाढतो.
६ ) हवेतील ओलावा ओढून घेते.
७ ) नत्र उपलब्ध होते.
८ ) प्रथिनांचे प्रमाणानुसार कुजण्याचा वेग वाढतो.
९ ) सजिवता वाढते.
१० ) पक्व वनस्पती आच्छादनाबरोबर तरूण वनस्पती आच्छादनाचे लवकर विघटन होते.
११ ) जमिनीत संजिवकांची निर्मिती होते .
१२ ) जमिनीत नविन घडण होते.
१४ ) पिकांच्या वाढीला आवश्यक अन्नद्रव्ये उपलब्ध होतात.
१५ ) स्थिर कर्ब जमिनीत स्थिरावतो.
१६ ) आंतरकाष्टांगजन्य विघटन.
१७ ) मर प्रतिबंधकता पिकात प्राप्त होते.
१८ ) सर्वच जैव रासायनिक क्रिया -प्रक्रियांचे नियंत्रण होते .
१९ ) जमिनीत वेगाने ह्युमसची निर्मिती होते.
२० ) कर्ब- नत्र गुणोत्तर कमीत कमी होते.
२१ ) एकदल-द्विदल आंतरपिकांचे आच्छादन मायेचा पदर असतो.
२२ ) जमिनीतील बंदिस्त अन्नद्रव्ये उपलब्ध होतात.
२३ ) मातीची धूप थांबून पाणी जिरते.
२४ ) आच्छादनाने देशी गांडूळे चमत्कार करतात.
२५ ) जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते.
२६ ) आंतरपिकांची मुळे कुजवून जमिनीस पहेलवान बनवण्याचे कार्य करते.
२७ ) जमिनीत मुबलक सुर्यशक्ति साठविली जाते.
२८ ) पिकाचा अन्न तयार करण्याचा वेग वाढतो.
२९ ) पिकांत साखरेचे प्रमाण, उत्पादन वाढवते व काष्टांचे उपलब्धता होते.
३० ) पिक प्रती पिक उत्पादन वाढतच राहते.
३१ ) बेण्याची उगवण व वाढीसाठी आवश्यक उष्णतामान मिळवून देते.
३२ ) उन्हाळ्यात व दुष्काळात फळझाडे व पिकांना जिवंत ठेवून जगवते.
३३ ) जिवाणू संख्या वाढतच राहते प्रकर्षाने जाणवणाऱ्या रोगांना आळा बसतो.
३४ ) जलधारणाशक्ती वाढते.
३५ ) जमिनीचा सामू नियंत्रित होतो.
३६ ) खारे पाणी सुसह्य होते.
३७ ) फळझाडांना भरपूर आधारमुळे फुटतात.
३८ ) जमिनीतील व हवेतील उष्णता ह्यांचे मधील परस्पर अदलाबदली रोखली जाते.
३९ ) जमिनीला अतिनील किरणांपासून वाचविते.
४० ) जमिनीत शक्ती संतुलन बनते.
४१ ) जमिनीत जैवगतीशास्त्राला चालना मिळते.
४२ ) वैश्विक किरनांना पकडून फळे व पिकांची प्रत सुधारते.
४३ ) पिकांची व फळांची चव तर वाढतेच शिवाय टिकाऊपणा पण वाढतो .
४४ ) हवेतील आर्द्रता वेळप्रसंगी मुळयांना व जिवाणूंना पुरवली जाते .
४५ ) जमिन क्षारपड होण्यापासुन वाचते.
४६ ) जमिनीवरिल वातावरण खेळते राहते.
४७ ) जमिनीचा आम्ल विम्ल निर्देशांक नियंत्रित होतो.
४८ ) जमिनीचे शुद्धिकरण होऊन पिकांत प्रतिकारशक्ति निर्माण होते.
४९ )जमिनीत गुरुत्वाकर्षण व केशाकर्षण शक्तींचे संतुलन साधले जाते.
५० ) सर्वात महत्वाचे म्हणजे जमिन वापसा स्थितीत राहते.

Comments

Popular posts from this blog

ऊस लागवड

क्षारयुक्त जमिनीची सुधारणा

जनावरांतील पोटफुगी - कारणे, लक्षणे व प्रथमोपचार